Sunday 22 November 2015

रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ...



           रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ...
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेतील संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे एव्हाना काहीनां माहित झाले आहेच. रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत  सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते.     भारतीय वित्त व्यवस्थेवरनियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते. रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली स्थापन ब्रिटीश ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला;  रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे. आधी आपण बाबासाहेबांचा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अभ्यास जाणून घेऊ.. सन १९१५ साली प्राचीन भारतीय अर्थनीती (Ancient Indian Commerce) या प्रबंधासाठी बाबासाहेबांना मास्टर ऑफ आर्ट्स हि पदवी मिळाली, त्यानंतर १९१६ साली त्यांनी " भारताचा राष्ट्रीय लाभांश ( National Divident of India) हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सदर केला जो ८ वर्षांनी पी. एस. किंग अंड सन्सया कंपनी ने " ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक विकास ( The evolution of provincial finance in british india म्हणून प्रसिद्ध केला. बाबासाहेबांनी या विस्तृत ग्रंथाच्या आवश्यक तितक्या प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. विद्यापीठाने अधिकृत पणे "Doctor of Philosophy" हा किताब बहाल केला. सन १९२३ च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक प्रबंध " भारतीय चलनाच्या समस्या "The problem the Rupee) पूर्ण झाला आणि त्यांनी तो कोलंबिया विद्यापीठात पाठवला आणि ते मान्य होऊन बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स DSc हि पदवी बहाल करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांचे सखोल ज्ञान आणि विषय मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद लिखाणावर कटाईम्स लंडन आणि इकोनोमिक्स या वृत्तपत्रांनी भरभरून कौतुक केले होते. ., भारतीय अर्थ व्यवस्थेचा सखोल अभ्यास विश्लेषणात्मक आणि मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण उपाय योजना, आर्थिक विकासासाठी असलेली दूर दृष्टी बाबासाहेबांच्या या तीनही प्रबंधातून सबंध जगाला दिसून आली.
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४--२५ मध्ये ब्रिटीश सरकारने "रोयल समिती" नेमली होती, त्यालाच Hilton Young Commission असेही म्हणतात; या समिती कडून बाबासाहेबांना भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलण्यास आमंत्रण आले, या समिती मधील प्रत्येक सदस्याच्या हातात "THE PROBLEM OF THE RUPEE" हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक होतं. बाबासाहेबांना आपला प्रबंध प्रत्येकजन संदर्भ म्हणून घेत आहेत हे पाहून आनंद झाला बाबासाहेबांनी या समिती समोर भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी, भारतीय चलनात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, मुद्रा कोणाच्या अधिपत्याखाली असतील, वित्तीय धोरण कसे राबवावे, चलनाचा मानदंड काय असावा. .संस्थान खालसा, सामुहिक शेती व्यवसाय आणि आर्थिक धोरण, जमीन कर, जमीनदारी पद्धती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, सोने हे मापदंड मानून चलन व्यवस्थे चे फायदे आणि तोटे मागील ४ दशकांचा आर्थिक आणि राजकीय आढावा, नाणे बंदी केल्याने होणारे फायदे, महागाई आणि चलन समस्या आणि निराकरण या आणि अशा अनेक वित्तीय, आर्थिक धोरणांचा, उपाय योजनांचा सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीत मांडणी केली आहे, ज्या दीर्घ काळापर्यंत बँक व्यावसायिक, अर्थशास्त्र विद्यार्थी आणि अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. वाचा  "Statement of Evidence to the royal Commission On Indian Currency"  
१९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. . रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रोयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला.
१९४९ साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली १९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे, आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती ; याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली; याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज / ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते. इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने डौलाने उभी आहे. भारतीय रिजर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे हे विकिपीडिया या सोशल साईट  ने दिले आहे परंतु  बँकेच्या अधिकृत वेब साईट वर हि माहिती कुठेही नाही हि शोकांतिका आहे.

No comments:

Post a Comment